आमची ओळख इंस्टाग्राम वर झाली होती. तसं आमचं लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप होतं, थोड्या दिवस इंटरनेटवर बोलल्यावर मी तिला फायनली प्रपोज केलं ती हो पण म्हणाली आणि मग आमचा रिलेशनशिप सुरू झाले. रोज कॉल्स ,मेसेजेस, कधी कधी व्हिडिओ कॉल रोज चालूच राहायचे. बघता बघता एक वर्ष पूर्ण झालं एक वर्ष कम्प्लीट झाल्यावर मी तिला भेटायला गेलो ,आधीच भेटलो असतो पण पेंडेमिक मुळे जमलं नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये मधल्या काळात तिच्या घरी आमच्याबद्दल कळालं तिच्या घरच्यांनी आमच्या नात्याला होकार सुद्धा दिला (असं तिने सांगितलं होतं.)
आम्ही दोघे भेटलो एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला. पण भेटून झाल्यावर थोड्या दिवसांनीच तिचं वागणं अचानक बदललं.
प्रत्येक वेळी मी कॉल करेल तेव्हा कॉलेजमध्ये आहे फ्रेंड्स बरोबर आहे असं बोलून मला ती इग्नोर करत होती. एक दिवस याच गोष्टीवरून आमचं कडाक्याचा खूप मोठे भांडण झालं. त्यानंतर दोन दिवस बोलणे बंद होतं. दोन-तीन दिवसांनी जेव्हा मी तिला मेसेज केला तेव्हा तिथून रिप्लाय आला की " हाय मी तिचा बॉयफ्रेंड, बोलतोय तू तिच्याशी बोलणं बंद कर".
असं झालं सगळं… मी रागाने तेव्हा तिला ब्लॉक करून टाकलं…😔😔
पण मला खरंच खूप आठवण येतेय तिची…😔😔😔